कधी कधी सगळ जग जिंकून जात तर कधी …
काय ती थट्टा काय ते विनोद
काय त्या आठवणी काय ती मस्ती
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ …
आज वर कधी कोणी असे वाईट समजले किवा बोल नाही …
आज वर प्रत्येक जन नुसता नाव काढत … नुसता नाव …
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ …
प्रेम आणि प्रेमाचे अणुभंध मैत्री समोर कधी टिकलेच नाही
प्रेम जे कधी उलघडले नाही तेवढ मैत्री ने शिकवलं
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ …
बस एकाच मनात खुपत राहत जे आहे ते तोंडावरच आहे … ??
कि मनापासून जपल आहे हे नात …
बावळट बेशरम कमीने सगळ्या अश्या मंत्रांनी नावाजले जात …
बस काय मैत्री म्हंटलकी चालत सगळ …
बस त्या मैत्रीला आता वेळ नाही आपल्याशी सांगड घालायची …
मैत्री आहे तिथेच बस आपण हरवून बसलो आहे स्पष्टत्व आणि गूढ मैत्रीच …
जे कधी एखाद्या कट्ट्यावर किवा कॅन्टीनमध्ये रंगायचं
ते आता इंटरनेटच्या जगात हरवलं आहे …
बस काय मैत्री आता "wss up" आणि "status update" एवढीच राहिली आहे …
--वर्षा नाईक
No comments:
Post a Comment